Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Live Updates 26 April 2025: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने सिंधू जल करारास स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, असे जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी शुक्रवारी म्हटले.
तसेच पहलगाम दहशतवादी हल्लाच्या पाठी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे पुरावे भारताने आंतरराष्ट्री समुदायाला दिले आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचे “इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर” पाकिस्तानातील किमान दोन ठिकाणी सापडले असल्याची माहिती भारताने परदेशी नेते आणि राजदूतांना दिली आहे. याचबरोबर असेही सांगण्यात आले आहे की, काही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यांच्या भूतकाळातील कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांमधील सहभागाची पुष्टी केल्यानंतर ते पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान भारतीय लष्कर आणि तपास यंत्रणांनी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर देत पाच अतिरेक्यांचे घर स्फोटकांनी पाडले आहे.